Thursday, April 30, 2020

Mike Tyson Quotes

Everyone has a Strategy till you get punched in the face.
A man that’s a friend of everyone is an enemy to himself.
Everyone has a plan 'till they get punched in the mouth.

As long as we persevere and endure, we can get anything we want.
I just want to conquer people and their souls.
Everybody's got plans... until they get hit.
My biggest weakness is my sensitivity. I am too sensitive a person.
I'm a dreamer. I have to dream and reach for the stars, and if I miss a star then I grab a handful of clouds.
I'll go back and take what the people owe me.
I don't understand why people would want to get rid of pigeons. They don't bother no one.
When Jesus comes back, these crazy, greedy, capitalistic men are gonna kill him again.


Mike Pharse is reworded:
"People were asking me [before a fight], 'What’s going to happen?,' " Tyson said. "They were talking about his style. 'He's going to give you a lot of lateral movement. He's going to move, he's going to dance. He's going to do this, do that.' I said, "Everybody has a plan until they get hit. Then, like a rat, they stop in fear and freeze.' "

From Quora
1. 
Mike Tyson’s quote was a variation of Joe Louis’s old saying “everyone’s got a plan until they get hit.”
Mike was saying, once a fight begins, everything is uncertain except the will and energy of the combatants.
The original quote by Louis, and Mike’s version of it, both refer to the simple reality that an old military quote makes clear.
No plan survives first contact with the enemy” which derived itself from the nineteenth-century Prussian Field Marshal Helmuth Karl Bernhard Graf von Molke. He wrote in 1880, “No plan of operations reaches with any certainty beyond the first encounter with the enemy's main force.”
The Duke of Wellington is also credited with saying “strategy ends when combat begins.”
In other words, you can plan, and strategize all day every day - and the second a fight begins, anything and everything can happen, and the plan is out the window. Molke the Elder also believed that the best strategist should prepare a series of options, with tactical flexibility to adapt, since your master strategy would be obsolete the moment it was deployed.
The reality is, in any sort of combat, whether it is military or in the ring, a master plan never survives past the first blow. There are simply too many variables for any person to plan successfully for them all. The best strategy is to have options predetermined and hope that is enough…
Mokle the Elder also wrote: “If in war, from the beginning of the operations, everything is uncertain except such will and energy as the commander carries in himself, there cannot possibly be practical value for strategy in general principles, rules derived from them and systems built up upon the rules.”
In other words, and again, what Mike was saying, there is limited practical value in strategiszing to use this or that move, because once a fight begins, everything is up in the air, and uncertain, except for the will and energy of the combatants.
Frankly, that is one way you can tell someone like Tony Kent, who actually has fought, from someone like Bob Garrett, who has not. The non-fighter believes you can plan this and that move to unfold like a fine script. The real fighter knows better - of course you should plan and train, but the ultimate ability for any fighter is the ability to adapt in real time in the ring as the unknown occurs.
And my friend Jon Jones is absolutely right that this principle applies to life itself.
Planning for the future is good, but it is also good to remember that “man proposes and God disposes.”

2. 
Well, what he meant was as Jon Jones has explained.
The reason this quote has been widely picked up both inside boxing and other martial arts is becuase a lot of people can spend a few hours punching a bag or doing kata, and get to thinking that they’re pretty hot shit.
But bags and thin air don’t punch back.
So bag-punchers and kata-ists can go into a fight thinking something like ‘first I’ll open him up with the jab, get him blocking high, then I’ll close and go low for the body, then I’ll maybe throw in a couple of hooks, and then it’s done and done’.
Which is all fine…until they get punched in the face, and realise that just because they have a plan, doesn’t mean that the other guy has agreed to follow it, and indeed almost certainly has a completely different and rather contrary plan of their own. Which they are now going to have to take into consideration and compensate for on the fly.

3. 
It means that it’s very hard to think straight, plan, and fight effectively when you’re scared, angry, full of adrenaline, and likely concussed. It’s a retort against armchair martial artists who are full of tricks and tactics that they don’t understand would be very hard to pull off when your eyes are swelling up, your balance is wavering and your heart is pounding.
It’s the same in most combat situations. The army spends a lot of time training it’s recruits to overcome that fear of death, because when shot at most people freak out, forget everything they ever knew about tactics, and end up firing wildly at shadows. When a champion kickboxer is hit over the head with a bottle in bar there’s a good chance he’ll turn round and wildly swing some telegraphged haymaker in the general direction of his opponent, the same as any other bum.
Put simply, the ability to stay calm, stay focused, and remember your training is a completely separate skill. One that can be just as important as your actual physical skills and tactics.
There’s also the fact that all plans hinge on basic assumptions. If you’re planning to dance around a slower opponent, you’re pretty much screwed when you step badly and sprain your knee. If you’re planning to go all out with the big haymakers for the KO, that plan will start looking decidedly more shaky when it turns out your opponent is an excellent counterpuncher.
What are you going to do then? If your answer is ‘hesitate’ or ‘keep to my doomed plan’, then you’re not going anywhere but the canvas.

4. 
Well he was referring to the plan boxers have to win a fight. And the quote is actually punched in the mouth. He meant that the deer in the headlights shock of being hit disrupts plans.
And rather like John Lennon's : life is what happens when you're busy with other plans, Mikes aphorism is actually quite deep, particularly for a pugilist, and the meaning can be read as deep and intelligent in contrast to the violence implicit in the actual words.
It was a quote one would expect Ali to fire off. And shows Tyson to be a much sharper man than his reputation and actions might suggest.





Sunday, April 26, 2020

Procrastination - quotes

"The way to get started is to quit talking and begin doing." - Walt Disney
🎨 🐭 🦆

🎨 Many people talk about what they want - but they don’t act on it

🎨 It could be because it feels too intimidating or overwhelming, or they simply don't feel like they have the time

🎨 But tomorrow you will wish that you had started today, because even small steps will eventually reach the destination

Thursday, April 23, 2020

stay with us - Madhava

I will make very tall building
Papa, once I grow up
my little son told me

Oh really!
I just said to made him carry on
I was thinking about how to fix 
current bug in my Python code

Yes, it will touch the sky,
such its height will be
wow!
again a lost exclamation.

And I will build temple on top
all gods will stay there with us
humm...humm
all god means all of them!
ok!

And building will be all made of glass
so when there is fire
I can see all and help folks quickly
and gods can help too!

They are like us - Madhava

I was reading news,
This is there war against us
They spread the virus to world to grow in rat race
They are our number 1 enemy...
Papa!
my son turned to me,
Papa, again he said
he was still playing with his toys
I like the china country
Why, I asked him
it was strange to hear from 5 year old
I was thinking he will not even know what does a country means
On the toys all I have
and plenty I have
made in china is what's written
They must be good folks
creating so many wonderful toys!
Shall we go there?
Yes, I smiled!
Once virus goes away!

Saturday, April 18, 2020

नामदेव ढसाळ - मुलाखत

‘गोलपिठा’कार, दलित पँथरचे नेते, दलित साहित्यात अत्यंत वेगळेपण जपणारे पद्मश्री नामदेव ढसाळ. एकेकाळी रस्त्यावरची लढाई लढणारे, मंचावरून व्यवस्थेला खुलेआम शिव्या देणारे नामदेव ढसाळ, आंबेडकरी चळवळ प्राणपणाने लढत लढत उत्तरार्धात शिवसेनेसोबत युती करणारेही नामदेव ढसाळच! व्यक्ती एकच; रूपं असंख्य! औरंगाबादहून प्रसिद्ध होणा-या साप्ताहिक ‘महाराष्‍ट्र काल-आज-उद्या’साठी सुनील पाटील यांनी घेतलेली त्यांची सडेतोड मुलाखत 28 मार्च 2005 च्या अंकात प्रसिद्ध झाली होती. तिचा हा संपादित भाग.
एकेकाळी अंगात ठायी ठायी विद्रोह असलेला आणि आक्रमकपणे महाराष्‍ट्रभर फिरणारा नामदेव ढसाळ आम्ही पाहिला आहे. आता तो आक्रमक दिसत नाही. थोडे शांत झाल्यासारखे आपण दिसता, हा शांतपणा का?
- मुळात लोकचळवळी, आंबेडकर चळवळ, समाजवादी चळवळ किंवा कष्टक-यांची चळवळ सुरू असताना आम्ही पँथरच्या माध्यमातून कार्यरत होतो, ती सर्व चळवळीतली माणसे होती. संसदीय राजकारणातही त्यांनी स्वत:ला जुळवून घेतले आहे. मी 1981 पासून एका आजाराने आजारी आहे. मेंदूने आज्ञा दिल्यानंतर शरीर चालते; पण हे सर्कल चालण्याकरिता जे रसायन तयार व्हावे लागते ते माझ्या शरीरात होत नाही. पूर्वी नेतृत्व करताना तुम्ही पाहिलेले आहे, म्हणून तुम्हाला तसे वाटते; परंतु अजूनही माझा पक्ष काम करतो. तो एका फ्रेममध्ये अडकला होता.
पक्ष काय करतोय? पक्षही आक्रमक का नाही? कसे वाटते आजचे राजकारण?
- आंबेडकरी चळवळीबद्दल नव्या पिढीच्या तक्रारी आहेत. त्या पिढीबद्दल तर बोलायलाच नको. सिद्धार्थ कॉलेजमध्ये बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर माझ्या पिढीपर्यंत अत्यंत कडवे आंबेडकरवादी होते. मात्र, आमच्या पिढीनंतर आलेले लोक तसे राहिलेच नाहीत. ते ‘कारणां’शी बांधील राहिलेले नाहीत. त्यांच्या सर्व दु:खांवर एकच दवा की, शासनकर्ती जमात होणे आणि मग ते कुठल्या तरी राजकीय पक्षाबरोबर लांगूलचालन करतात. युत्या नाही, तडजोडी असतात. मग त्यात दोन-चार जण खासदार, कोणी आमदार होतात. महत्त्व संपले की त्यांच्या जागा राजकीय पक्षाचे लोक दाखवूनच देतात. अशा संक्रमणात ही चळवळ अडकली आहे. जनलढा, रस्त्यातला लढा यापुढे अटळ आहे. बाबासाहेबांनी घटनेद्वारे मूलभूत अधिकार अस्पृश्यांना मिळवून दिले. या माणसांना उत्पादन साधन देण्याची लढाई होण्यापूर्वीच त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांच्यामुळे या अस्पृश्य माणसाला आजच्या व्यवस्थेत उत्पादन साधन प्राप्त करून देण्यासाठी जी अंतिम लढाई लढणे आवश्यक आहे, त्या लढाईचे भान कुणाला दिसत नाही.
पँथर फुटल्यावर काय त्रास झाला?
- दलित पँथर स्थापन केल्यानंतर 4 वर्षांत ती फुटते याचे कारण काय? कारण तोच पँथर जो बुद्धिस्ट. ज्या अस्पृश्य लोकांनी बौद्ध धर्म घेतला नाही त्यांचे काय? आंबेडकर साहेबांनी बौद्ध धर्म दिला आहे. अख्ख्या जगाला बुद्धिस्ट बनवेन असे ते म्हणत, म्हणजे काय? देशाला, समाजाला विज्ञाननिष्ठ करणे. आपल्याकडे भांडवली लोकशाही आहे. तिला सामाजिक रूप आणण्यासाठी ज्या काय चळवळी कराव्या लागतात त्या मी करेन, हा त्याच्या मागचा अर्थ असतो. आमच्या मंडळींनी काय अर्थ घेतला की, सर्व समाज, कल्चर हे बुद्धिस्ट करू. म्हणजे काय? मग सुरुवात काय तर जातिप्रथा तोडायची असेल, तर ‘अ’ पासून ‘ज्ञ’ पर्यंत जो कोणी हिंदू आहे त्याचा नि:पात केला पाहिजे. ह्या देशामध्ये सूडाने, तलवार हाती घेऊन जातिप्रथा कोणी तोडायला येत असेल, तर तो सर्वात मूर्ख आणि गाढव माणूस आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एका जातीला संघटित करून जातिप्रथा तोडण्याची भाषा जर कोण करत असेल तर त्याच्यासारखा महामूर्ख तोच. जातिप्रथा तोडण्यासाठी अस्पृश्यांसकट जे महारेतर आहेत, त्यांना तुम्ही सोबत घेऊन काम केले पाहिजे. महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी बाबासाहेबांबरोबर सहस्रबुद्धे, टिपणीस होते. त्या वेळी एका ठरावाच्या निमित्ताने सहस्रबुद्धे यांनी स्वत:च्या हाताने मनुस्मृती जाळली होती. ही जादू आंबेडकरांमुळेच होऊ शकते. ब्राह्मण समाजातील अनेक लोक त्या वेळी बाबासाहेबांबरोबर होते. तुम्ही तुमच्या अस्पृश्य भावंडालादेखील जवळ येऊ देत नाही. त्यांना मी नेता मानायला तयार नाही, कारण हे उद्दिष्ट नसलेले व आंधळे लोक आहेत. हा आंधळेपणा तुम्हाला फॅसिझमकडे घेऊन जातो. आपण म्हणतो, बाळासाहेब ठाकरे, अडवाणी फॅसिस्ट आहेत. फॅसिझम असा येत नाही. धर्माधिष्ठित राजकारणाच्या काही गोष्टी त्यांनी केल्या, पण तो फॅसिझम नव्हता. फॅसिझमचे एक शास्त्र आहे. हिटलर असा आपोआप होत नाही, त्यासाठी कडवा राष्‍ट्रवादी बनावं लागतं आणि अख्खा समाज तो वेठीस धरतो. हिटलरला मरेपर्यंत जर्मन माणसांचा पाठिंबा होता. त्यासाठी त्याला मोठे औद्योगिकीकरण करावे लागले. येथे काय आहे? बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही हिटलर ही उपाधी देणार? ते चातुर्वर्ण्य मानतात म्हणून? पण चातुर्वर्ण्य आहे कुठे? कायद्याने अस्पृश्यता हा गुन्हा ठरवल्यानंतर घटनेने त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आम्ही दलित पँथर स्थापन केली त्या दिवसापासून आजपर्यंत त्याच दृष्टीने आमचे थिंकिंग आहे. आमच्यातले जे महारेतर पळून गेले, कारण त्यांना गिनतीतच धरत नव्हतो. मी त्यानंतरही इंदिरा गांधींबरोबर प्रयत्न केला. कम्युनिस्टांनी आमच्या सिद्धांतावर आमच्याबरोबर यावे, यासाठी प्रयत्न केला. आता आरपीआयबरोबरही प्रयत्न केला.
पण आता कुणाची थांबायची तयारीच दिसत नाही?
- कार्यकर्ते राहिलेच नाहीत आता. त्यांना रिटर्न्स पाहिजे असते. आता माझ्याकडे कोणी आले तर मी त्यांना पैसे न घेता पक्षाचे काम करणार का, विचारतो. आमच्याकडे शंभर लोक आहेत. आम्ही त्यांच्या चहापाण्याचा, जेवणाचा खर्च देत नाही. नेत्यांनी त्यांना चुकीचा मार्ग दाखवला आहे. आंबेडकर चळवळीचे उद्दिष्ट काय ते त्या कार्यकर्त्यांना विचारा, त्यांना सांगताच येणार नाही.
- मार्क्सवाद व आंबेडकरवाद पँथर फुटीला कारणीभूत आहे का?
दादासाहेब गायकवाडांच्या, बी.सी. कांबळेंच्या पिढीतले जे लोक आहेत त्यांनी एक फ्रेम तयार केली. त्या फ्रेमच्या पलीकडे जो कोणी जाईल तो आंबेडकरवादी नाही. कम्युनिझमविषयी आंबेडकर साहेबांचे एक बेसिक म्हणणे असे होते की, कम्युनिस्ट व्यवस्थेमध्ये जी प्रोजेक्टेरियल डिक्टेटरशिप आहे ती दुष्ट आहे. सत्तेसाठी केला जाणारा जो वर्गसंघर्ष आहे त्याच्यामुळे हिंसा होते आणि ज्या व्यवस्थेमध्ये हिंसा आहे, ती मला मान्य नाही, पण आंबेडकर साहेबांना स्टॅलिनबद्दल प्रेम होते. त्यांना मार्क्सचे वावडे एवढ्यासाठीच होते की, पीसफुल ट्रान्झिशनबाबत. पीसफुल ट्रान्झिशनच्या गोष्टी पुढे क्रुश्चेव्हने केल्या. ते तोडून टाकण्याचे काम गोर्बाचेव्हने केले. आंबेडकरांनी त्या वेळी असे मत व्यक्त केले होते की, मार्क्सवादामध्ये माणसांच्या मनाचाच विचार केला जात नाही. बाबासाहेब 1952 ला निवडणुकीत उभे राहिले. त्या वेळी दोन मते टाकावी लागायची. एक सर्वसाधारणसाठी आणि दुसरे अस्पृश्य माणसासाठी. त्या वेळी डांगेंनी कटकारस्थान रचले. त्यांच्यामुळे आंबेडकर पराभूत झाले. आंबेडकर का पडले? तर काँग्रेस पक्षाने काजवळकरांना उभे केले. चांभार आणि महार यांच्यामध्ये लावून दिली. काजवळकर यांना आंबेडकरांच्या नखाची सर येणार नव्हती, पण काँग्रेसनेच ते केले होते. काँग्रेस शेवटच्या क्षणी थोडी बदलली. घटना परिषदेचा अगोदरचा आराखडा हा एतद्देशीयांचे ब्रिटिशधार्जिणे राज्य ब्रिटिशांना निर्माण करावयाचे होते. तो कच्चा आराखडा पूर्ण दुरुस्त करून नवीन उभारले आणि मग आंबेडकर ‘आंबेडकर’ झाले.
-आंबेडकरवाद आणि मार्क्सवाद एकत्र येऊ शकतील का?
- आंबेडकरवाद असा जो आपण म्हणतो त्याच्या सैद्धांतिक अधिष्ठानांशी जर आपण परिचित नसू तर आंबेडकरवादाचा काही उपयोग आहे का? हातात तलवार घेऊन हिंदूंची कत्तल करणे म्हणजे आंबेडकरवाद का? आंबेडकरवाद म्हणजे जातिप्रथा नष्ट करणे. स्वातंत्र्याच्या पन्नाशीनंतरही या देशामध्ये 800 प्रमुख जाती आणि 5 हजार उपजाती आहेत. मग धर्माधिष्ठित राजकारण करणारे भाजपासारखे पक्ष असोत किंवा त्यांचा मित्रपक्ष शिवसेना असो किंवा त्यांच्याबरोबर जाणारे तथाकथित 22 डेमॉके्रेटिक पक्ष. या सर्वांनी 5 वर्षे देशावर राज्य केले, पण हेच सर्व आहे का?
- रस्त्यावरचा लढा अपेक्षित आहे, असे तुम्ही म्हणता आणि नव्या पिढीला काही देणे-घेणे नाही, असेही म्हणता...
-नवीन पिढी म्हणजे कोण, जी सुरक्षित आहे. पाहता पाहता या पिढीने सिद्धार्थ कॉलेजमध्ये गणेशोत्सव, नवरात्रोत्सव सुरू केले. मुळात देव नाही, ही ठाम भूमिका आंबेडकरांची आहे. जे स्वत:ला आंबेडकरवादी म्हणत होते, त्यांच्या प्रभावाखाली असलेले विभाग, वस्त्या तिथेही हे सुरू आहे.
-शिवसेनेने विधान परिषदेवर पाठविण्याचा विचार कधी केला का?
- युतीच्या काळात शेवटच्या काही महिन्यांत ते मला मंत्री करणार होते. मात्र आठ महिने बाकी असताना भाजपने जी गणिते मांडली ते समीकरण शिवसेनेला स्वीकारणे भाग होते. शिवाय मला आमदार, खासदार करावे यासाठी मी मैत्रीच केली नव्हती. संसदीय राजकारणाशिवाय रस्त्यातले लढे उभे करावे आणि हे लढे सवर्ण आणि दलित यांना जोडू शकतील असे भौतिक प्रश्न निर्माण करून अशा विचाराच्या पक्षांना बरोबर घेऊन पुढे जावे, असे मला तेव्हाही अपेक्षित होते. पण ते काही झाले नाही.
-भाजपकडे तुम्ही कसे बघता?
- मुळात भाजपला किंवा पूर्वाश्रमीच्या जनसंघाला कोणी पुढे आणले? आम्ही नाही. आंबेडकर चळवळीने केलेले नाही. आणीबाणीविरुद्ध जी एक मोठी लढाई उभी राहिली, इंदिरा गांधी घराण्याच्या विरोधात, त्यांनीच हे काम केले. त्या चळवळीत संघ उतरला. त्या वेळी मार्क्सवादी त्यांच्याबरोबर होते ना? जयप्रकाश नारायणांबरोबर सिंडिकेट काँगे्रस होती. त्यांच्याबरोबर नक्षलवादी ग्रुप होते. आज उजवे, प्रतिगामी लोक लढ्यात आहेत. ते बदलताहेत, लोकशाहीवर त्यांची धारणा आहे. आता तुम्ही एकदा त्यांना दरवाजे मोकळे केल्यानंतर आता रडण्यात अर्थ आहे का? काँग्रेस फक्त संधिसाधू आहे.
- दलित साहित्य आज कुठल्या टप्प्यावर आहे?
- दलित साहित्य हा वाङ्मयाचा, मराठी साहित्यातला एक संप्रदाय आहे. दलित आणि सवर्ण अशा दृष्टीने याकडे पाहता कामा नये. प्रत्येक साहित्याचा एक काळ असतो. प्रस्थापित साहित्यात मुळात तोचतोपणा आल्यानंतर किंवा मिरासदारी तयार झाल्यानंतर एक स्थितिस्थापकता तयार होते आणि त्याविरुद्ध नवीन - नवीन प्रवाह तयार होतात, मग ते बंड करतात. या दृष्टीने आपण दलित साहित्याकडे बघितले पाहिजे. दलित साहित्य या संज्ञेने का पुढे आले? तर त्याच्या अगोदर अनियतकालिकांची चळवळ झाली आणि या चळवळीने 1960-70 च्या दशकात जे काही प्रचंड काम केले, त्यातून या पुढल्या वाटा तयार झाल्या. त्यातून दलित साहित्याचा प्रकार आला.
- साहित्यातले नामदेव ढसाळ जेवढे यशस्वी झाले, तेवढे राजकारणातले झाले नाहीत. अ‍ॅडजस्टमेंट तुम्हाला जमल्या नाहीत का?
- अ‍ॅडजस्टमेंट कुणाला म्हणायचे? रामदास आठवले करतो ती अ‍ॅडजस्टमेंट? माझे एकच ध्येय आहे. जातिप्रथा तोडण्याच्या दृष्टीने काय जुळणी होते ते पाहायचे.
- पँथरची जी एक भाषा होती, त्यामुळे लोकांना आकर्षण वाटायचे, ती गरज होती का की पँथरच्या भाषेमुळे नुकसान झाले?
- पँथरच्या भाषेनेच फार मोठे नुकसान झाले. आम्ही चार वर्षे हिंदूंना, त्यातही ब्राह्मणांना शिव्या दिल्या. त्याचा आज निश्चित पश्चात्ताप होतो. धर्मग्रंथाला शिव्या दिल्या. एका विवक्षित वेळेला असे घडले की काँग्रेसने 153(अ) असे खटले टाकून ती चळवळच संपवून टाकली ना. आम्ही जे केले ते चुकीचे होते, हे आता कळते. व्यवहारातून शहाणपण येते ना? राग आपल्याला वैराच्या ठिकाणीच घेऊन जातो ना? त्यातून काही निष्पन्न होत नाही. यादवी करायला पण तुम्ही ताकदवान असावे लागते ना? तुम्ही एकाच जातीला संघटित करणार. 5 हजार जातींमध्ये अस्पृश्यांना 250 जाती आहेत. त्यातून फक्त महारांना संघटित केले तर होईल का क्रांती? महारांच्यामध्ये 45 पक्ष आहेत, 45 संघटना आहेत, वेगवेगळे प्रवाह आहेत आणि नवीन मध्यमवर्ग आहे. त्याला फक्त खाओ-पिओ-कमाओ बस्स.
-एखादी राहून गेलेली गोष्ट कोणती?
- करायची मुख्य गोष्टच राहून गेलेली आहे, ती म्हणजे जातिप्रथेविरुद्ध लढा उभारणे. त्याची जुळणी होणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी मी वर्षानुवर्षे काम करतोय, अजून ते जुळत नाही, याची खंत आहे. ते आज ना उद्या होईल. मी डाव्या-उजव्या या परिकल्पनेत आता अडकत नाही. डावे कुणाला म्हणायचे, उजवे कुणाला म्हणायचे? सोनिया गांधींपेक्षा वाजपेयी आणि अडवाणी लोकशाहीवर अधिक चांगले बोलतात. सत्तेसाठी डाव्या आणि उजव्याचा प्रश्नच नाही. आता भ्रम तयार झाला आहे. शंकराचार्यांच्या मायावादासारखे सुरू झाले आहे. डावे कुठले? सब माया है.

Gilbert O'Sullivan - Alone Again (naturally)



In a little while from now
If I'm not feeling any less sour
I promise myself to treat myself
And visit a nearby tower
And climbing to the top will throw myself off
In an effort to make it clear to whoever
What it's like when you're shattered
Left standing in the lurch at a church
Where people saying: "My God, that's tough"
"She stood him up"
"No point in us remaining"
"We may as well go home"
As I did on my own
Alone again, naturally
To think that only yesterday
I was cheerful, bright and gay
Looking forward to who wouldn't do
The role I was about to play?
But as if to knock me down
Reality came around
And without so much as a mere touch
Cut me into little pieces
Leaving me to doubt
Talk about God in His mercy
Who if He really does exist
Why did He desert me?
In my hour of need
I truly am indeed
Alone again, naturally
It seems to me that there are more hearts
Broken in the world that can't be mended
Left unattended
What do we do? What do we do?
Alone again, naturally
Looking back over the years
And whatever else that appears
I remember I cried when my father died
Never wishing to hide the tears
And at sixty-five years old
My mother, God rest her soul
Couldn't understand why the only man
She had ever loved had been taken
Leaving her to start with a heart so badly broken
Despite encouragement from me
No words were ever spoken
And when she passed away
I cried and cried all day
Alone again, naturally
Alone again, naturally

https://www.youtube.com/watch?v=D_P-v1BVQn8

Tuesday, April 14, 2020

Vadari- Namdev Dhasal

वडारी दगडांना स्वप्न देतात ..
मी फुलबाजा पेटवतो …
बापाच्या आयुष्यात उतरू नये म्हणतात …
उतरतो … कानाकोपरा खाजवतो …
वडारी दगडांना फुलं देतात …

मी बेंडबाजा वाजवतो …
चार स्त्रियांच्या कमानी देहातून ….
कातळलेला उभा पारशी ओलांडतो …
बापाचा रक्ताळलेला पुठ्ठा पाहतो ….
अंधाराच्या गोन्दणीत ओठ भाजेपर्यंत सिगार ओढतो , उसमडतो …
वडारी दगडांना गरोदर ठेवतात …
मी थकलेले घोडे मोजतो …
स्वतःला टांग्याला जुंपून बापाचे प्रेत हाताळतो , जळतो ….
वडारी दगडांना रक्तात मिसळतात
मी दगड वाहतो …
वडारी दगडाचं घर करतात …
मी दगड डोक्यात घालतो …. मी दगड डोक्यात घालतो …

मी मारले सूर्याचे रथाचे सात घोडे - Namdev Dhasal

वाल्मीकीची कार्बनकाॅपी व्हायचे नव्हते मला 
प्रपंचाच्या रगाडयाने केले मला पापाचे धनी 
बायकोला म्हणालो--'घे यातले थोडेसे वाटून' 
तिने कानांवर हात ठेवले! 
मुलालाही हीच वाक्ये म्हणून दाखविली 
त्याने तर अंगाला पान सुद्धा लावुन घेतले नाही 
वाल्मीकीने पापाचे ओझे वाहत वाहत अजरामर 
आर्षकाव्य तरी लिहिले. 
आणि मी? 
मी जगण्याचे ओझे येथपर्यंत वाहत आणले. 
हे जगण्याच्या वास्तवा 
आता तुच सांग मी काय लिहू?

या कवितेला स्वतःचं अस्तित्व असू दे... Namdev Dhasal

या कवितेला स्वतःचं अस्तित्व असू दे,

जरी असलो आपण एकमेकांसाठी त्रयस्थ.

हातातील प्राजक्ताची फुलं कोमेजू न देणार वय होत ते.

ओठांचं थरथरनाऱ्या गुलाबांच्या पाकळ्यात रुपांतर होण्याचं वय होत ते.

क्षितीजाने महासागर प्राशून टाकण्याचं वय होत ते.

तरीही हा सारा अनुभव अस्पृश्याचाच राहिला.

जे काही घडायला पाहिजे होत ते या जन्मातच.

ज्या 'स्कूल' मधून मी आलो, त्याच्या सिलाबसमध्ये पुनर्जन्माला जागा नव्हती.

ना तू ज्युलीयट होती, ना मी रोमिओ,


तरीही आपण एका व्याकुळ प्रेमकथेतली पात्र होतो.
 

थोडा वेळ तरी.. - Namdev Dhasal

काही माणसं असतात चारित्र्यवान
काही माणसं असतात चारित्र्यहीन
म्हणून पाऊस पडायचा राहत नाही ग्रीष्मातही झाडे जळायची राहत नाही.
जीवंतपणीच नरक वाट्याला आला मेल्यानंतरच्या स्वर्गाचं अप्रूप कशाला ? 
फारच जीव कोंडून गेला रे 
थोडा वेळ तरी गड्या उघड आकाशाची खिडकी

तिच्यासाठी (गोलपिठा) - Namdev Dhasal

नरकात तिला ऋतू आला 

तिच्या ओटीपोटी लखलखीत बीजपण-- 

आभाळ मनातल्या मनात 

कुढणा-या माणसागत होत गेलं 

फ़िक्कट पिवळसर 

देणंघेणं नसताना 
ती रस्त्यातुन पैंजणत जाताना 
जंतूंच्या समस्त जमातीनं 
सहस्त्राक्ष गुढ्या उभारल्या 
असोशी वाहणा-या गटारांनी 
थम घेऊन--तिच्यासाठी 

प्रार्थना भाकली--दुवा मागितला

गोलपिठा - Namdev Dhasal

माणसाने पहिल्याप्रथम स्वतःला   

पूर्ण अंशाने उध्वस्त करुन घ्यावे 

बिनधास डिंगडांग धतींग करावी 

चरस गांजा ओढावा 

अफीन लालपरि खावी 

मुबलक कंट्री प्यावी - ऐपत नसेल तर 

स्वस्तातला पाचपैसा पावशेर डाल्डा झोकावा 
दिवसरात्र रात्रंदिवस तर्रर रहावे 
याला त्याला कुणालाही आयभयणीवरून 
गाली द्यावी धरुन पिदवावे... 
माण्साने जवळ रामपुरी बाळगावा 
गुपची फरशी तलवार शिंगा हॉकी बांबू 
ऍसिडबल्ब इत्यादि इत्यादि हाताशी ठेवावे 
मागेपुढे न पाहता कुणाचेही डेहाळे बाहेर काढावे 
मर्डर करावा झोपलेल्यांची कत्तल करावी 
माण्साला गुलाम बनवावे त्याच्या गांडीवर हंटरचे फटके मारावे 
त्याच्या रक्ताळ कुल्ल्यांवर आपल्या घुगर्‍या शिजवून घ्याव्या 
शेजार्‍याला लुटावे पाजार्‍याला लुटावे बँका फोडाव्यात 
शेठसावकाराची आय झवून टाकावी नात्यागोत्याचा 
केसाने गळा कापावा जेवणातून विष घालावे मूठ मारावी 
माण्साने कुणाच्याही आयभयणीवर केव्हाही कुठेही चढावे 
पोरीबाळींशी सइंद्रिय चाळे करावे म्हातारी म्हणू नये 
तरणी म्हणू नये कवळी म्हणू नयी सर्वांना पासले पाडावे 
व्यासपीठावरून समग्र बलात्कार घडवून आणावे 
रांडवाडे वाढवावेत : भाडखाव व्हावे : स्त्रियांची नाकं थानं 
कापून मुड्या गाढवावर बसवून जाहीर धिंडवडे करावेत 
माण्साने रस्ते उखनावेत ब्रीज उखडावेत 
दिव्याचे खांब कलथावेत 
पोलिसस्टेशने रेल्वेस्टेशने तोडावीत 
बसेस ट्रेन कार गाड्या जाळाव्यात 
साहित्यसंघ शाळा कॉलेजं हॉस्पिटलं विमानअड्डे 
राजधान्या इमले झोपड्या वखवखलेल्या भुकाळ वस्त्या 
यावर हातबाँब टाकावेत 
माण्साने प्लेटो आइन्स्टाइन आर्किमिडीस सॉक्रेटीस 
मार्क्स अशोक हिटलर कामू सार्त्र काफ्का 
बोदलेअर रेम्बो इझरा पाउंड हापकिन्स गटे 
दोस्तोव्स्की मायकोव्हस्की मॅक्झीम गॉर्की 
एडिसन मिडिसन कालिदास तुकाराम व्यास शेक्सपीअर 
ज्ञानेश्वर वगैरे वगैरेंना त्यांच्या शब्दांसकट गटाराचे 
मेनहोल उघडून त्यात सलंग सडत ठेवावे 
येसूच्या पैगंबराच्या बुद्धाच्या विष्णूच्या वंशजांना फाशी द्यावे 
देवळे चर्च मशिदी शिल्पे म्युझियम्स कुस्करुन टाकावे 
पंड्यांना बंड्यांना तोफेच्या तोंडी द्यावे त्यांच्या रक्ताने 
भिजलेले रुमाल शिलालेखावर कोरून ठेवावेत 
माण्साने जगातील सर्व धर्मग्रंथांची पाने 
फाडून हागायचे झाल्यावर त्यांनी बोचे साफ करावेत 
कुणाच्याही कुंपणाच्या काठ्या काढाव्यात आता हागावे मुतावे गाभडावे 
मासिक पाळी व्हावे शेंबूड शिंकरावे 
घाणेंद्रिये जास्त घाण करतील असे शेवटून घ्यावे 
जिकडे तिकडे वरखाली खालीवर मध्ये नरकच नरक 
उभारावेत..... अश्लील अत्याचारी व्हावे माण्सांचेच 
रक्त प्यावे डल्ली सल्लीबोटी खावी चर्बी वितळवून प्यावी 
टिकाकारांचे गुडसे ठोकावेत हमनदस्ती पाट्यावर 
वर्गयुद्धे . जातियुद्धे . पक्षयुद्धे . धर्मयुद्धे . महायुद्धे 
घडवून आणावी पूर्ण रानटी हिंस्त्र आदिम बनावे 
बेलाशक अराजक व्हावे 
अन्न न पिकवण्याची मोहिम काढावी अन्नावाचून पाण्यावाचून याला त्याला 
स्वतःलाही मारावे रोगराई वाढवावी वृक्ष निष्पर्ण करावेत कुठलेही 
पाखरू न गाईल याची दक्षता घ्यावी माण्साने विव्हळत किंकाळत 
लवकरात लवकर मरण्याचे योजाने 
हे सारे सारे विश्वव्यापू गळूप्रमाणे फुगू द्यावे 
अनामवेळी फुटू द्यावे रिचू द्यावे 
नंतर उरल्यासुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये लुटू नये 
काळागोरा म्हणू नये तू ब्राम्हण तू क्षत्रिय तू वैश्य तू शुद्र असे हिणवू नये 
कुठलाही पक्ष काढू नये घरदार बांधू नये नाती न मानण्याचा 
आयभैन न ओळखण्याचा गुन्हा करू नये 
आभाळाला बाप आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत 
गुण्यागोविंदाने आनंदाने रहावे 
चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे 
एक तीळ सर्वांनी करंडून खावा माण्सावरच सूक्त रचावे 

माण्साचेच गाणे गावे माणसाने 

मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे - नामदेव ढसाळ

मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे
ये व माझा स्वीकार कर
सात घटकेचा मुहूर्त
आधीव्याधीनंतर
सर्वांगसुंदर प्रतिमासृष्टी
अश्विनीरुप ऋतुस्नात कामातूर लक्ष्मी
सर्पस्वरुप विष्णू उर्ध्वरेत स्खलित
सूर्याचे अनुष्ठान
हे शेष सूर्याच्या चेहऱ्या
हे कामेच्छेच्या माते
हे आदिती
माझ्या प्रियेचा दगड
मला अधिकच प्रिय आहे
4 वेद 18 पुराणं 6 शास्त्र
मी मारतो लंडावर
6 राग 36 रागिण्या मी खेळवतो उरावर
छान, या सुभगवेळी
तू संभोगेच्छा प्रदर्शित करतेस?
स्त्रीची कामेच्छा पुरी न करणं
कवी असल्यामुळे मी समजतो पाप

कोकिळा गातायत राजहंस गातायत

पानंफुलं झिम्माफुगडी खेळतायत
खरंच गं, तुझ्या अरण्यानं नवीन रंग धारण केलाय
द्वैत भावातल्या शुभाशुभाची सावली
जिथे नजर टाकतो तिथे अथांग शृंगार
अस्तित्वाच्या दर्पणात तुझा कैफ उभा
विस्ताराचे संदर्भ, नश्वर अनवरत जलधार
अराजकता, निरर्थकता
सरळ सोप्या प्रतिमांतून रुप घेणारं तुझं लावण्य
सत्याच्या अंतहीन रेषेला स्पर्श करणारा
आकाशानंतरचा विलुप्त स्वर्ग
अप्राप्य प्रेमाच्या गोष्टीअगोदरचा क्षुद्र दैनिक मृत्यू
ध्वनी वळणानंतर होत जातो पुष्कळ
नेपथ्याच्या जागी फेकलं जातं द्रवरुप
तीन वृक्षांच्या तीन तऱ्हा
कालोदयाबरोबरची चकोर वाढ
चंद्रकिरणांचं नृत्य
चंद्रकोरीवरली धूळ चोच मारुन एक चिमणी झटकते आहे
हिरवळीच्या चादरीत दवबिंदूंचा चेहरा लपलेला
सहस्त्रमुखांनी
हे सर्व पूर्वसमुद्राला मिळण्यापूर्वी
या नि:शेष साम्राज्यात मला माझ्या
अभिशप्त एकांतापर्यंत जाऊ दे
मी भ्रमणयात्री
या शहरातलं हे हवेचं तळं
तळ्यामधल्या न्हात्याधुत्या पोरी
खडतराची तुळई आणि उशी
गवत ढग आणि पाण्याचा विभ्रम
हिर्वा आशीर्वाद घेऊन माझा आत्मा निघाला आहे भ्रमणाला
दुपारी
जनावरांसारखं रवंथ करणं कदाचित नसावं त्याच्या
अंगवळणी
तुझी मर्जी ठेव उजेडावर
उजेड म्हंजे ज्याला मी म्हणतात
नाहीतर कोसळून जातील विद्यापीठातले बुद्धीजन्य वारस
आता काहीच हरवण्यासारखं उरलं नाही
आता काहीच मिळण्यासारखं राहिलं नाही
‘मारा’चा पाऊस सहन करणारी नुसती एक सशक्त पोकळी
आणि कुणाचीही भिंत चोरुन अंगावर चालत येणारा ज्ञानेश्वर
कल्पनेचा महारोग
बेंबी / मेंदू / फुफ्फुस यांतून
या सर्व रोगलागणीनंतरही
ही ज्ञानपीठं आनुवांशिक, त्यांच्या अंतरंगातून
झुलती घरं इच्छांची
ही बैठकीच्या जागेतली शापितं आणि गुपितं
भाषेचं वस्त्र भाषेचा साज भाषेचा रोग आणि
भाषेचा हातमाग
आठवणी बालपणाच्या आणि परिपक्वतेच्या
चालतो परंतु अंतर कापलं जात नाही
ही खोड जडतरातली
बिछान्याचं पातं
बिछान्याचे आयने
शाईच्या पंखातून प्रसवणारं समृद्धीचं नागरिकत्व
भविष्य होऊन जातं डोळ्यातलं गढूळ पाणी
कल्पनेच्या पंज्यात सापडतो निराशयाचा उंदीर
सार्वजनिक जागांचं गावठी माहात्म्य उठतं पेटून
लक्षवेधी सूचनेनुसार
नि:श्वास लागतो पिकू
दृष्टीक्षेप होतो प्रस्थापित
वर्ष, वर्षामागून वर्ष
परंतू शकत नाहीत मूळ जागी
कितीतरी गमावलं
कितीतरी कमावलं
वेळ करु शकत नाही सहाय्य
तू एक दुखरा क्षण ठेव माझ्यासाठी जपून
मी तुझ्यातून
फाटक्या भणंगासारखा निघून जाणार नाही
मुंबई, मुंबई
माझ्या प्रिय रांडे
मी तुला नागवून जाईन
कालचक्राची विलोभनीय रुपं
‘नशीब’ नावाचा दरोडेखोर त्यांवर प्रहार करणारा
“चार आनेकी मुर्गी
बारा आनेका मसाला”
शतकांच्या जखमांवर किती मलम चोळायचं?
 सुळावरच्या पोळ्या किती उपसायच्या?
किती ठेवायचे आठवणीत दगड?
प्रत्येक ठेचेत एक एक मृत्यू सहज आणि रगड
या भूमिगतपणातून व्हायचं असं प्रगट
मर्मात आवाज भिडू द्यायचा आकाशाला
समुद्राचा खवळता
वीज आणि ज्वालामुखी
ढगाची छत्री या समुद्रनवरीच्या माथ्यावर
वऱ्हाडी, करवल्या आणि करवले
ही वरात अशीच वाजत गाजत चाललेली
धुळीच्या चेहऱ्याला जखमी करणारा घोड्याचा नाल
ही मायावी पृथ्वी करु शकणार नाही आपलं कल्याण
पोटभर घालणार नाही जेवू खावू
पाशवी थैमानांचं आंधळेपण
आंधळा न्याय तीक्ष्ण नख्यांचा
या अगाध गहनतेत पेरलेलं दु:ख माझं
हे स्त्रोतफूल अनुपातातलं लोकोत्तर
सुलभत्या वैभवाचा होतो असा गर्भपात
भूतभविष्याच्या डोहात जाऊ दे मला बुडून
हजारो वर्षांपासून ही पाखरं कैदेत तडफडणारी
माणसांचा समुद्र, विशालतर बंदरं
कावळे बगळे पोहते पाणपक्षी
समुद्राची मुडप महिरप घडपडघडीची
काठ्या डोलकाठ्या उभारती शिडं आव्हानांची
सिंदबादच्या सफरी
नानाविध रुपं समुद्रखेळाची
सूर्य असा गुंजेसारखा होऊन जातो गडीगप्प पाण्यात
क्षितिजाच्या पलिकडे त्याला असं शोधायला निघायचं
आपल्याच रक्ताचे नि:स्पंद भोग असे राजरोस जागवायचे
दळणवळणाचे जाळे
ट्रेन, बसेस, डिलिव्हरी व्हॅन्स
सात लाख वाहनांनी प्रदूषित काळीकभिन्न झालेली तू
ओंजळभर पाण्यात आपण जीव द्यायचा काय?
हे असं नाकातोंडात पाणी
ही अशी नाकाबंदी
घ्या सुय्या पोत बिबं
बाये
हायका
डबा बाटली
कागद कपटा
हेपट्यावर हेपटा
ही मुंबई खरंच कोणाला उपाशी निजू देणार नाही
ही मुंबई खरंच कोणाला उपाशी मरु देणार नाही
कंच्या भूगर्भातील पुरुषार्थाशी ही रात्र
संग करु पहातेय?
सीमांत, देहांत
या गिरण्यांची बटनं
कोण ऑन करतात?
दुर्दम्य स्पर्शाचं रोरावणं
संकीर्ण वेदनांचा परावश चित्कार
या बीजांना कोणाच्या आज्ञेवरुन अंकुर फुटतात
संप मोर्चे निदर्शनं घेराओ
जमल्यास लुटुपुटूचा लाँग मार्च
जीवनातल्या विषाचा विलंब
सुखदु:खाचा तोळामासा
ना आत ना बाहेर
स्वच्छ निळ्यात, सताड चंद्र उभा
रोशनीची उन्नत लहर, नि:स्तब्धता
जागोजागी क्षार हरवलेल्या अदृश्य गंधाच्या लाटा
माझ्याच ओढाळ देहाचा तू एक अवयव
माझ्याच रात्रीचा तू एक विभाग
मी वेडा आहे तुझ्यासाठी
छप्पर फाडून तू खाली ये
जोपर्यंत रोपित करत नाहीस तुझं अभिजात प्रेम
मी भुकेला आहे तहानलेला आहे आणि निद्रानाशानं त्रस्तसुद्धा
मी मागतो आहे भीक खणानारळाची
धुतले तांदुळ आणि तांदुळज्याची भाजी
एक दुसऱ्याला स्पर्श करणारी आपली ऱ्हदयं
आजपर्यंत मी ठेवला नसेल तुझ्यावर विश्वास
आलो नसेन तुझ्या ढावळीत
चाटल्या नसतील जिभेनं अंतरंगातल्या जखमा
तुझा उदय होतो आहे
उद्या काहीही वाढून ठेवलेलं असू दे ताटात
मीही असा पोस मागायचं सोडून
धेडगा नाचवीन
भुईनळाची झाडं, हवाई डब्या आणि अॅटम
सनईसूर ताशा आणि लेझीमची घाई
रात्रंदिवस तुझ्याच इच्छेची विभिन्न रुपं
ही आत्मारामाची कंपनी
तिच्यात सर्वच कसं होत रहातं ठणठणपाळ
हरहुन्नरी संदेश जाऊ दे घरोघर
भिकेवरल्या हाकेची निर्लज्ज दारं जाऊ देत कोसळून
उभारली जाऊ देत गुढ्या तोरणं
होऊ दे एकदाचं सीमोल्लंघन
हे सूर गोंधळात टाकणारे
ही वेळ आकाशाला चावणारी
अग्निवृक्षाचं कारंजं
चमकणाऱ्या प्रपातात उडी घेणाऱ्या धबधब्या
तू माझ्या पकडीतून निसट आणि चालू लाग
तू जाऊ शकत नाहीस कुठेही
तू राहू शकत नाहीस कुठेही
वर्तमानाला होऊ दे पायाचा स्पर्श
पावसात गंजून गेलेलं लोखंड
बाजाराचा भंगार आणि जथ्था
कुत्र्याचे रेशमी डोळे, जीवनाच्या
धारणेला संचलित करणारे
सूर्याची कॉइल पाहते आहे उडू
झावळतीच्या तारखा
या म्हणीच्या मध्यावरला
मी आशीष
मला रस्त्याचे क्रॉस चालत नाहीत
दगड चिरडला जातोय
माणूस चिरडला जातोय
होतेय सर्वस्वाची खडी खडी
पाडली जातेय खडी
फोडली जातेय खडी
हवेतले तुटते मनोरे
दऱ्यांचे ओठ रक्तबंबाळ होणारे
प्रस्फोटित होणाऱ्या मूलभूत कल्पना
गिलोटिनची इंद्रियं
छातीच्या स्लाइस
बेंबीची भाकरी
वक्ष:स्थळाची दारू
हवेची मुलगी डोळ्यांत नाचरी
कुत्र्याच्या डोळ्यांतला काकुळतीचा घननिळा
लाल पिवळा हिर्वा सर
किती मजेचा
घडाघडीची इमारत
जीवशास्त्राच्या पानावरली हालचाल
बीजकोषांना काढलं जातंय सोलून
घातलं जातंय जखमांना खतपाणी
पिकू लागते भुवई
शांततेचं मोडून पडतं तंगडं, मुळं दुखावतात
अवकाशात ऋतू राहतात जळत
कारागृहाच्या, गजाआड जळतात मेणबत्त्या
दगड उगवू लागतात आत
हवेची तीक्ष्ण चोच खुपसली जाते
बाईच्या अंगात
टांगलं जातं वळचणीला पाणी
बीजकोष गातात साती आसऱ्यांच गाणं
निदर्शनं करुन झोपलेलं पाणी
होऊन जातं लेकुरवाळं
दृष्टीचं यंत्र
सुसंवादाचा फ्लास्क
या जडशीळ प्रकाशापेक्षा
हलकं आहे तुझ्या कामांगाचं वजन
माझ्या देहाच्या पेटीत
हे कसले क्षण बंद करुन ठेवलेयस?
अवकाशाची कशी करायची घडी?
कशी
नांदवायची ज्योत त्रिभुवनांची?
हीनदीन पूर्वीपासूनच्याच सुरुवाती / समाप्ती
वयाशिवाय वाहणारा वारा
धूळ प्रकाश ध्वनी यांचा कारखाना
संभ्रमात टाकणारे रंगनंग
आंधळेपणाचं दगडी गाढव
व्यापारी खेळवतात अस्वलं
घणाघात सर्व आर्थिक नसनाड्यांवर
फिरला जातोय शुभ्रतेवर पोचीरा
कटक्यानं पुसले जातात मुलाबाळांचे आक्रोश
राजवंशातले कावळे वाहून आणले जातात कासवाच्या पाठीवर
अरे कुणीतरी बघा
या मुलांची नखं वाढलीयत
सुस्वरांची दारं आणि प्रार्थनांचे गुडदे
खरीखुरी शीळ
कारंज्याच्या स्पर्शानं भिजून जाणारी
माझा अहंकार जातो आहे तुटून
मी तिचा हात पकडू इच्छितो
मी तिचा सहचारी होऊन चालू इच्छितो
आज 29 ऑगस्ट
सपंत आलेल्या पावसाच्या गोष्टी
कोसळ्याच तर अजूनही एकदोन सरी कोसळतील
आजही
ओल्या पंखावरली ओलीचिंब नक्षी घेऊन पक्ष्यांचे कळप
लहरा घेतील आजही,
एखाद्या बगिच्यात प्रेमाच्या नांवाखाली जोडपी
सांडतील सालंकृत धातू आजही
लालजर्द स्कॉच
रत्नजडिताचं झाड
छान
या दिवसाचं नामकरण करतेयस तू
तू माझा विहंगअमानुशतेचं पाणी
वस्त्र आणि अंग
या इच्छांना भर्जरी कपडे नेसवू नकोस
फॉस्फरसातून तय्यार होणारी माणसं
सुईचं घड्याळ, खांद्यांला स्पर्श करणारं,
या सर्वांना आग लागली तर तुझीही वाफ होऊन जाईल
हे खऱ्याखुऱ्या मुली
हे शृंगारिक लावण्यांमधल्या चंद्रावळी
या चतकोर सूर्याचा हट्ट सोड
पिवळं वादळ पंखांना इजा करणारं
त्यात हा असा रक्ताचा मुका ढोल
मी, चिरतृष्ण, तुला बहाल करु इच्छितोय
हिरवे जादूभरे नयन
त्यांत बॅक्टेरियाचे जंतू परंपरेला डिवचतात
पहाता पहाता संस्कृती निघते मोडीत
तू तुझी सर्व हाडं उघडी करुन टाक
रात्र उतरते आहे झाडावरुन खाली
दफनभूमीवर उगवलं आहे हिर्वं गवत
विद्युद्दाहिनीची चोच होऊ लागली आहे रेशमी
प्रत्येक शब्दाचं घातलं जातंय शवविच्छेदन
सत्याचा लुळा पाय घालू लागला आहे घोळ
बैठकीचं उत्सुक पाणी लागलं आहे आटू
या अंधारातल्या घोड्यांच्या खिंकाळ्या मी ऐकतो आहे
महाश्वेता झोपली आहे भुजांवर
तिला डिस्टर्ब नको
माझी आदिवासी छगुनी
आकाश आणि पृथ्वी
जन्म आणि मृत्यू
परमेश्वर आणि मनुष्य
उदय होतोय की अस्त
सर्व चेहरे सारखेच आहेत
सर्व नावं सारखीचं आहेत
जीवनाचं वाहन थांबता थांबत नाही
संपता संपत नाही
या भरंवश्याच्या जगात
बेभरंवश्याचा महोत्सव
शहर एक दगड
किंवा नावाचा चिरेबंद
गुलाबाचं स्वातंत्र्य
कायद्याचा खेळ
वायद्याची दारु
मेंदूत पसरते आहे शाई
ग्रंथालयं होतात खुन्यांचे संदर्भ
विद्यापीठं होतायत बेडुक-लोणच्यांच्या बाटल्या
हे सूर्या
या शहराला पिऊन टाक
हे पृथ्वी, या शहराला पोटात घे
हे पाण्या
या शहराला हवेत छिनून ठार कर
मनुष्य धूळ आणि हवेतला उत्तराधिकारी
ढगांच्या थिएटरात
मीठ चिवडणारे नाकतोडे
अंतर खणलं जातंय
अनुवंशिक रोगांना जागवलं जातंय
लक्ष्मी / सरस्वती पक्षपाती रांडा
आम्ही या म्हटलो त्या आल्या नाहीत
आमच्या खाली निजा म्हटलो
त्या निजल्या नाहीत
तू आमच्याशी इनाम राख
तू आमच्या बिछान्यांना जागव
अनंताची मुरली वाजव
तू आमच्या स्वप्नांना खेळव
तू आमच्या रेतांना अंकुर फोड
हे भटकभवाने
हे अतिशुद्रे
हे खंडोबाच्या मुरळे
हे नाचनारणे
हे हमदर्दी रांडे
मी तुझ्यातून फाटक्या भणंगासारखा
निघून जाणार नाही
तुझं सत्त्व फेडून घेईन
तू अल्लखनंदाचे दरवाजे वेडझव्यांसाठी खुले कर
मुंबई मुंबई, माझ्या प्रिय रांडे
मी तुला खेळवून जाईन
मी तुला असा खिळवून जाईन
- नामदेव ढसाळ