Tuesday, April 14, 2020

थोडा वेळ तरी.. - Namdev Dhasal

काही माणसं असतात चारित्र्यवान
काही माणसं असतात चारित्र्यहीन
म्हणून पाऊस पडायचा राहत नाही ग्रीष्मातही झाडे जळायची राहत नाही.
जीवंतपणीच नरक वाट्याला आला मेल्यानंतरच्या स्वर्गाचं अप्रूप कशाला ? 
फारच जीव कोंडून गेला रे 
थोडा वेळ तरी गड्या उघड आकाशाची खिडकी

No comments:

Post a Comment